बच्चू कडूंच्या उपोषणाला यश – सरकारकडून लेखी आश्वासन


शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन आणि इतर मागण्यांबाबत महसूलमंत्र्यांकडून लेखी हमी
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या अमरावतीतील बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफी, दिव्यांग मानधनवाढ आणि संबंधित बैठकींच्या आयोजनासंबंधी लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे घेण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
बच्चू कडूंच्या उपोषणाला सरकारचा प्रतिसाद! महसूलमंत्र्यांचं लेखी आश्वासन –
* शेतकरी कर्जमाफीवर १५ दिवसांत निर्णय
* दिव्यांग मानधनबाबत ३० जूनपूर्वी घोषणा
* मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची बैठक लवकरच
 जनतेसाठी संघर्षाला मिळाले यश!