विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावणार पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे प्रतिपादन 


रायगड ( प्रतिनिधी ) आजचा दिवस नवीन उत्साह घेऊन येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहणार असतो. शासनाच्या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्वाची असते. प्रवेशोत्सव हा उपक्रम शासनाने सुरु केला आहे. ते केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची वाढावी हि या उपक्रमातील जमेची बाजू आहे. प्रवेशोत्सव केवळ छायाचित्रण करण्यासाठी नाही तर प्रवेशोत्सवापासून पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज राहायला हवे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच शाळेमधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन  रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक  आँचल दलाल यांनी दिले.
वेश्वी येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत गुरुवारी प्रवेशोत्सव आणि नवगतांच्या स्वागतासाठी शाळेतील ‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन आणि पालकांबरोबर संवाद साधला.
आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळाव यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करीत असतो. शिक्षणाच्या बाबतीत पालकांनी जागरूक होऊन आपल्या मुलाला जिल्हा परीषदेच्या शाळेत उत्तम शिक्षण कसे मिळून देता येईल यासाठी प्रयत्न करण अवश्यक आहे. वेळोवेळी शिक्षकांची भेट घेऊन आपल्या पाल्याची शैक्षणिक क्षमता जाणून घेत त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की पालकांनी सोशल मिडीयाचा वापर करताना आपल्या मुलाला त्याचा शैक्षणिक फायदा कसा होईल हे पाहील पाहीजे. गणित विषयातल्या शाॅर्ट कीजची ओळख दिली पाहीजे. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसतील तर त्याचा पाठपुरावा करणे तितकेच महत्वाचे असल्याचे आँचल दलाल यांनी सांगितले.
पालकांनी युट्यूब आणि इन्टाग्राम वापरताना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करणे अवश्यक आहे. युट्यूबवर अभ्यासाविषयक मुलांसाठी विविध मार्गदर्शक असतात, ते जाणून घेत आपल्या मुलाला त्या कौशल्याचा कसा उपयोग करता येईल याकडे लक्ष केंद्रीत करा असा सल्ला जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी उपस्थित पालकांना दिला.
**********
पहिलीत प्रवेश करणार्‍या सहा विद्यार्थ्यांना शाळेच्या उंबरठ्यात उभे करुन कुंकवाच्या पावलांचे ठसे कागदावर घेत अनोखे स्वागत करण्यात आले. आगळ्यावेगळ्या स्वागताने मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहात होता. नव्याने पहिलीमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेबद्दल आकर्षण निर्माण विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन शिक्षण विभागाच्यावतिने स्वागत केले. यावेळी पालकांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.