पुणे : कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 3.30 वा सुमारे घडली. या दुर्घटनेत पूलावरून प्रवास करणारे सहा जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. पूल कोसळण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, जोरदार पावसामुळे पूल कमकुवत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी पूल आणि नदीकाठच्या परिसरात जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. अधिकृत मृतांची संख्या आणि ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(ही बातमी अधिकृत अपडेट्सनुसार पुढे सुधारित केली जाईल.)