नागाव बंदर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन 


अलिबाग (प्रतिनिधी): नागाव बंदर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.
या उद्घाटनप्रसंगी बोलताना सरपंच हर्षदा मयेकर म्हणाल्या, “गावकऱ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणं ही माझी जबाबदारी आहे. पाण्याशी संबंधित समस्या दूर करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे.”
या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे गावातील शेकडो कुटुंबांना स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनीही सरपंच मयेकर यांच्या कार्याची प्रशंसा केली असून, “सकारात्मक नेतृत्व आणि ठोस कामगिरी यामुळे नागाव गावाचा विकास वेगाने होत आहे,” असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी सौ. श्वेता कदम,ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, तसेच महिला व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली असून, याचा दीर्घकालीन फायदा ग्रामस्थांना होणार आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक खोलीचे संपूर्ण बांधकाम श्री. सचिन राऊळ यांनी स्व:ताच्य खर्चाने केले.